शेवटची कविता.....तुझ्यासाठी
म्हणे नाती खूप अनामोल असतात.....
जितकी मजबूत बनतात
तितकीच लवकर
तुटत असतात ......
खरच ही नाती अतूट असतात का....?
जाताना
म्हणतेस विसर मला
जमलेच तर आता सावर स्वत:ला
खरच प्रत्येकाला विसरणे
सोपे असेल तर......
मी खरच तुला विसरू शकेन का ?
आज मारतो
आहे स्वत:ला
एक नवे आयुष्य जगण्यासाठी
जगलो होतो ते नाते जपण्यासाठी
खरच
मी तुझ्याशिवाय जगू शकेन का ?
अश्या अनेक कविता...
आज धूळ खात
पडल्या आहेत......
तुझ्याचसाठी.....लिहिलेल्या....
कदाचित
तू त्या वाचल्या असशील............
कदाचित
नसशीलही.....................
wow
ReplyDelete